प्रतिनिधी / लातूर :
गेली काही वर्षांपासून लातूरला उजनी धरणाचे पाणी मिळवून देण्याच्या घोषणा झाल्या. 2019 च्या निवडणुकीत तर आजच्या सत्ताधाऱयांनी निवडून आल्यास दोन महिन्यात लातूरला उजनीचे पाणी देऊ, अशी घोषणा केली होती. पण राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिल्यानंतर लातूरला उजनीचे पाणी मृगजळच ठरलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्याचे जलसंपदा मंत्रीही आहेत. लातूर दौऱयावर असताना स्वतः होऊन लातूरला उजनीचं पाणी मिळण्यासंदर्भात अमित देशमुख, संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील यांनी निवेदन दिल्याचा उल्लेख केला.
उजनीचं पाणी लातूरला देण्यासाठी मी कोणतेही आश्वासन दिले नाही, देणार नाही, मागील काळात हे पाणी कोण किती दिवसात मिळवून देतो म्हटले, आश्वासन दिले माहित नाही. मी या पाण्यासंदर्भात कोणतेही आश्वासन देणार नाही पण उजनीचं पाणी लातूरता देता येते का, याविषयी मी तज्ञांना अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची शक्मयता कितपर्यंत आहे, देता येते की नाही हे पूर्णपणे अभ्यास केल्यसानंतरच सांगता येईल. पाणी देण्यासंदर्भातील विषय कायदेशीर अडचणीचा आहे. कृष्णा पाणी लवादासोबत बसून चर्चा करावी लागेल असे पाटील यांनी स्पष्ट केले.
खुद्द जलसंपदा मंत्र्यांनीच उजनीचे पाणी लातूरला मिळण्यासंदर्भात अडचणी मांडल्याने प्रत्येक निवडणुकीत उजनीचे पाणी निवडणुकीनंतर लगेचच आणून देतो हा साफ खोटेपणा ठरत असून, लातूरकरांसाठी उजनीचे पाणी मृगजळच ठरत आहे.
21 नव्हे 7 टीएमसी गेल्या काही वर्षांपासून मराठवाडÎाच्या हक्काचं पाणी 21 टीएमसीच्या चर्चा चालू होत्या. एवढे पाणी हा आमचा हक्क आहे असेच या विभागातील जनतेनी ग्रहीत धरले होते. पण जलसपंदा मंत्र्यांनी हक्काचं म्हटलं जाणारं हे पाणी 21 टीएमसी नसून 7 टीएमसी असल्याचे स्पष्ट केले आहे.
लातूर-उस्मानाबाद हे कमी पावसाचे क्षेत्र आहेत. या जिह्यातील मांजरा, निम्न तेरणा हे प्रकल्प 2020 पर्यंत पुर्णत्वाकडे नेऊ, लातूर जिह्यातील तिरू व मन्याड नदीवरील कोल्हापुरी बंधाऱयाचे रूपांतर बॅरेजमध्ये करण्यासाठी प्रयत्न, वळण बंधाऱयाचे माध्यमातून जायकवाडी, माजलगाव धरणात पाणी आणण्याचा प्रयत्न पाटील यांनी बोलून दाखविला. या पत्रकार परिषदेस संजय बनसोडे, बाबासाहेब पाटील, विक्रम काळे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, प्रशांत पाटील, सौ. आशाताई भिसे, संजय शेटे आदींची उपस्थित होते.
अमित देशमुखांनी दिले होते आश्वासन
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अमित देशमुख यांनी लातूरकरांना आमची सत्ता येताच 1 महिन्याच्या आत उजनीचे पाणी देवू असे आश्वासन दिले होते. सत्ता येवुन दीड वर्ष लोटत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील उजनीच्या पाण्या प्रश्नासंदर्भात विचारले असता, उजनीच्या पाण्याबाबत अद्याप अभ्यास चालू असून अजुनपर्यंत कोणते आश्वासन दिले जाणार नाही असे स्पष्ट केले. राजकीय नेते आपल्या सोयीनुसार आश्वासन देतात असेही ते यावेळी म्हणाले.