खा. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा उपक्रम
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्यावतीने करमाळ्यात सुरु झालेल्या ऑक्सिजन बँकेमुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना मोठा आधार मिळेल असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने सुरु केलेल्या ऑक्सीजन बँकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फिलिप्स कंपनीचे स्वयंचलित ऑक्सीजन उत्पादन करून रुग्णांना थेट ऑक्सीजन पुरवठा करणारी पाच मशीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी करमाळा तालुका साठी दिले आहेत. इमर्जन्सी रुग्णांना दूरवरच्या रुग्णात रुग्णवाहिकेतून हलवत असताना या मशीनचा मोठा उपयोग होणार आहे. पाच लिटर ऑक्सिजन रुग्णाला देण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. शहा हॉस्पिटल तसेच पवार हॉस्पिटल करमाळा येथे या मशीन आजपासून सुरू करण्यात आले आहेत. या ऑक्सीमीटर मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. शहा व डॉ. पवार यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने वतीने नुकतेच 722 नेत्र रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप केले आहे.दिव्यांग व्यक्तींना वाकर काठी असे साहित्य वाटप करण्यात आले आहेत त्याच प्रमाणे गेल्या महिन्याभरात जवळपास 140 रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले आहेत.
आज स्वयंचलित ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून देऊन ऑक्सिजन बँक सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार या कोरोनाच्या काळात करमाळा शिवसेने समाजाला मदतीचा हात दिला आहे. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी करमाळा कुटीर रुग्णालय येथे ऑक्सीजन प्रकल्प मंजूर केला आहे. याची ही मागणी करमाळा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बार्शी येथे मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे केली होती .नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आठ दिवसाच्या आत करमाळा कुटीर रुग्णालयात उभारत असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाची ची टेंडर नोटीस निघणार आहे.
करमाळ्यातील खाजगी हॉस्पीटलमधून तसेच रक्त तपासणी च्या नावाखाली बेकायदेशीर पैसे वसूल केलेली असतील किंवा मेडिकल दुकानदाराने बिल दिले नसतील ज्या रुग्णांकडून जबरदस्तीने ज्यादा रकमा वसूल केले असतील अशा रुग्णांनी शिवसेनेकडे तक्रारी कराव्यात अशा रुग्णांना त्यांचे संबंधित हॉस्पिटलकडून त्याचे पैसे परत मिळवून दिले जातील असे आव्हान शिवसेनेने केले आहे.