तरुण भारत संवाद प्रतिनिधी/कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहर व परिसरात दुपारच्या सुमारास अचानक काही सेकंद घरावरील पत्रे, खिडक्यांची तावदाने हादरली. अनेक जण भूकंपाचा हादरा आहे की काय म्हणून घराबाहेर पडली आणि परिस्थितीचा अंदाज घेऊ लागली. परंतु हा हादरा काही सेकंदापुरताच जाणवल्यामुळे नागरिक संभ्रमात पडले नेमका हा हादरा कशाचा होता.
काही वेळातच सोशलमिडियावरील नागरिक सक्रिय झाले आणि याबाबत प्रत्येकजण आपला अनुभव सांगू लागला.अनेकांना याचा अनुभव आल्याने हा भूकंप आहे की काय याबाबत चर्चा सुरु झाली. परंतू याबाबत कोणतीही अधिकृत अशी माहिती शासनाकडून देण्यात आली नाही.शहरात मात्र याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती.