प्रतिनिधी / वैराग
वैराग ता. बार्शी गोहत्या बंदी कायदा लागू झाला असला तरी छुप्या मार्गाने जनावरांची वाहतूक करून कत्तलीसाठी शहरात नेली जात आहेत. गौडगाव धामणगाव रोड जवळ कत्तलीसाठी अकलूजहून उस्मानाबादला जाणाऱ्या १२ गायी व १ बैल घेऊन जात असताना टॅम्पो सह जनावरे पकडून तीघांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही कार्यवाही शनिवारी पहाटे सव्वादोन वाजणेचे सुमारास वैराग पोलिस पथकाने केली. अधिक माहिती अशी की गोहत्या बंदी कायदा असला तरी कायद्याला बगल देत काही भागात आजही अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती वैराग पोलिसांना मिळताच गौडगाव, धामणगाव मार्गावर नाकाबंदी करून जनावरे भरलेले टेम्पोने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
अकलूजहून उस्मानाबादला कत्तलीसाठी जनावरे घेऊन वाहन जात असताना त्या ठिकाणाहून जाणारा टॅम्पो.क्र. एम.एच. १२.सी.एच.०००९ हयास थांबवून चौकशी केली असता गायी, बैल यांना क्रूरतेने, वळून छळ करून बांधून कत्तलीसाठी घेऊन जातांना मिळून आले. याबाबत वाहनचालक रामपाल दत्तात्रय खंडागळे रा. अकलूज, व्यापारी शहानवाज गुलाब कुरेशी, अकलूज, व्यापारी जलील कुरेशी उस्मानाबाद, सचिन ठोंबरे रा. वैराग या चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आयशर टेम्पो , १२ गाई, १ बैल एकुन असा १० लाख, २० हजार रुपयाच मुद्देमाल जप्त करत पोलिस शिपाई बाळकृष्ण यशवंत मुठाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारद्र परजने करीत आहेत.