नागरिकांनो, लक्षणे आढळल्यास तातडीने करा तपासणी, कोरोनाचे नियम पाळण्याची गरज
दररोज 1500 ते दोन हजारपर्यंत वाढत आहेत रुग्ण
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कडक उपाय योजना करीत आहे. मात्र, दुसरीकडे जिह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार मोठ्या संख्येने वाढत चालला आहे. त्याचबरोबर दररोज 30 ते 40 रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कडक उपाययोजना बरोबर, मृत्यूचे प्रमाण रोखणे प्रशासनासमोर आवाहन असणार आहे. जिह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत सोलापूर जिह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा स्प्रेड चांगलाच वाढला आहे. एप्रिल-मे दरम्यान दररोज दीड हजाराहून अधिक रुग्ण आणि 30 हुन अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामागे सर्वात प्रमुख कारण की, कोरोनाचे लक्षण दिसल्यास तातडीने रुग्ण तपासणी करत नसल्यामुळे कोरोनाच्या संख्योबरोबरच मृत्यूचा आकडा वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर तपासणी वाढल्यामुळे आकडा जास्त दिसत असल्याचेही सांगण्यात आले.
भीती, दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ
सोलापूर जिह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या धास्तीमुळे व लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे. मोहोळ येथे कोरोनाच्या भितीपोटी, सांगोला येथील शिक्षक पंढरपुरातील निवडणुकीची डÎुटी करून आल्यानंतर कोरोनाचे लक्षण दिसले तरी तपासणी न केल्यामुळे कुटुंबातील चारजणांना कोरोनाची लागण झाली. उशिरा तपासणी केल्यामुळे यामध्ये मृत्यू ही झाला. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करा.
ग्रामीण भागात कोरोना वाढण्याची ही आहेत कारणे ग्रामीण भागात दररोज दहा हजाराहून होतेय कोरोना चाचणी, त्यामुळे संख्येत दिसतेय वाढ लक्षणे असून सुद्धा ही नागरिक उशिरा तपासणी करतात, त्यामुळे कोरोनाचा स्प्रेड वाढला, मृत्यूचे प्रमाण वाढत आहे कोरोनाचे नियम पाळत नाहीत, मास्क, सॅनीटायझर, सोशल डिस्टन्स, विनाकारण घराबाहेर पडणे |
नागरिकांनी लक्षणे आढळल्यास चाचणी करावी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक लक्षणे असून सुद्धा उशिरा रिपोर्ट करतात त्यामुळे धोरणाचा प्रसार वाढत आहे. उशिरा दाखवल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनाचे लक्षण आढळल्यास संपर्क करा, घाबरून न जाता लवकर निदान करून तपासणी करून उपचार घ्यावेत यामुळे रुग्ण बरे होईल. तपासणी जास्त वाढल्यामुळे रुग्णसंख्या वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, योग्य माहिती द्यावी. मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर |
ग्रामीण भागातील रुग्णसंख्या, मृत्यूचे प्रमाण
तारीख | रुग्णसंख्या | मृत्यू |
1 मे | 2015 | 27 |
2 मे | 1668 | 29 |
3 मे | 1656 | 27 |
4 मे | 1841 | 29 |
5 मे | 1830 | 34 |
6 मे | 1937 | 38 |
7 मे | 1966 | 42 |
8 मे | 1889 | 45 |
9 मे | 1777 | 4 |