प्रतिनिधी / कुर्डुवाडी
सध्या कोरोनाचे भय महाराष्ट्रात घोंगावत असताना शासनाने कठोर उपाययोजना राबविण्यासाठी सर्व संबंधित विभाग अधिकाऱ्यांना आदेश असताना कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या टेंभुर्णी पोलिसांना मात्र कोरोनापासून अभय असल्याचे दिसून येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेला नेहमी सुरक्षा उपाय अवलंबविण्याचे धडे देणाऱ्या पोलिस स्टेशन मध्ये चक्क महिला दिन विनामास्क साजरा करण्यात आला. यावरून लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र..अशी नागरिकांतून प्रतिक्रिया येत आहे.
प्रशासनाने कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन कडक अंमलबजावणी करत असताना लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम काटकोरपणे पाळा असे नागरिकांना आवाहन केले जात असताना विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिस दंडात्मक कारवाई करताना दिसत आहे . बेजबाबदार नागरिकांवर अशी कारवाई होणे हे अगदी स्तूत्य आहे.
पण ही कारवाई करत असताना शासनाने घालून दिलेले नियम हे केवळ सामान्य नागरिकांसाठी नसून सर्वांसाठी आहेत त्यामध्ये कारवाई करणारे पोलिस प्रशासन देखील आले. परंतू याचा टेंभुर्णी पोलिसांना पोलिस ठाण्यात महिला दिन साजरा करताना विसर पडल्याचे दिसत आहे.