आपचे महावितरण कार्यालयास इशारा
गोदूताई परुळेकर भागात नागरिकांना दिले वीज कनेक्शन जोडून
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
वीज बिल न भरलेल्या नागरिकांचे विद्युत पुरवठा खंडीत करू नका अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरण अभियंता चंद्रकांत दिघे यांना दिले होते निवेदन दिले. मात्र तरी सुद्धा महावितरण कडून नागरिकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत.त्यामुळे आपच्या वतीने गोदूताई परुळेकर येथील वसाहत मध्ये नागरिकांचे तोडलेले कनेक्शन जोडून दिले. तुम्ही वीज कनेक्शन तोडला तर आम्ही जोडू असा इशाराही आमच्या वतीने देण्यात आला.
दरम्यान, गोदूताई बिडी घरकुल येथून बऱ्याच नागरिकांचे फोन आम आदमी पार्टी ला प्राप्त झाले ज्यात महावितरण कडून लेखी १५ दिवसांची नोटीस न देता त्यांच्या घरच्या वीज तोडण्यात आल्याच्या तक्रारी मिळाल्या. आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष मो. अस्लम शेख ह्यांनी सदर नागरिकांना भेटून समस्या जाणून घेतल्या. वीज तोडणी बेकायदेशीर असल्या कारणाने स्वतः ती विजे चे तयार जोडून वीज पुरवठा पूर्ववत केला. जमुना बलराम आडम ह्या विधवा महिलेचे वीज बिल फक्त रु ४०५० थकीत होते तरी देखील त्यांचे वीज खंडित करण्यात आले होते. त्यानंतर वीज कनेक्शन जोडून देण्यात आले.
विद्युत कायदा सन २००३ चे सेकशन नं ५६ नुसार लेखी, पूर्ण १५ दिवसांची नोटीस देऊनच वीज खंडित करण्याची प्रक्रिया करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टी अशा विद्युत खंडित झालेल्या नागरिकांचे वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत करेल. तसेच विद्युत पुरवठा खंडित करण्यास येत असलेल्या वीज कर्मचारी व अधिकारी ह्यांच्या घरां समोर बोंबाबोंब आंदोलन करेल असा इशारा शहराध्यक्ष अस्लम शेख यांनी दिला.