प्रतिनिधी / सोलापूर
वांगी-येळेगाव सीमेवरील पांगळे वस्तीवरील बेदाणा प्लांटवरील कामकाज तब्बल 15 दिवसानंतर शनिवारी सुरळीत सुरू झाला. या प्लांटवर 28 शेतकऱयांचा साधारण 2 कोटींचा 100 टन बेदाणा अडकून पडला होता. दरम्यान अवकाळी पाऊस, वादळी वाऱयाने द्राक्ष, बेदाण्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र त्या 41 मजुरांची सुटका झाली अन् बेदाणा प्लांट पूर्ववत झाल्याची माहिती येळेगावचे सरपंच गंगाधर सारोडे यांनी दिली.
सोलापूर बाजार समितीमध्ये बेदाणे विक्री केंद्र उपलब्ध करून दिल्याने मागील तीन वर्षांपासून दक्षिण सोलापूर तालुक्मयातील गावांमध्ये बेदाणे प्लांट उभारण्यासाठी शेतकऱयांनी पुढाकार घेतला. पांगळे वस्तीवरील बेदाणा प्लांटदेखील दोन वर्षापूर्वी सुरू झाले. सोलापुरातील साधारण 20 गावांतील शेतकऱयांनी आपली द्राक्षे या पांगळे वस्तीवर बेदाण्यासाठी दिली.
दरम्यान 8 एप्रिल रोजी पांगळे वस्तीवरील मजूर ग्वाल्हेरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने या वस्तीसह तीन किलोमीटरची सीमाहद्द बंद केली. बेदाणा प्रक्रिया प्लांट पूर्णपणे ठप्प झाले. त्या मजुरांच्या अतिसंपर्कात असलेले 41 मजूर व वस्तीवरील दहा कुटुंबांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करून डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. अवकाळी त्यात कोरोनाचा फटका या शेतकऱयांना बसला. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱयांचे प्लांट बंद झाल्याने निराश ते झाले होते. अखेर 14 दिवसाच्या निगराणीनंतर त्या 41 मजुरांची व कुटुंबांची सुटका झाल्यानंतर शनिवारपासून बेदाणा प्लांट सुरू झाल्याने शेतकरी आता पुन्हा आशादायी बनला आहे.
आमदारांनीघातलेलक्ष
पांगळे वस्ती सील झाल्यानंतर काही दिवसांनी त्या 28 शेतकऱयांनी आर्थिक नुकसान टाळावे, याकरिता प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱयांकडे दाद मागितली होती. मात्र प्रशासन आपल्या मतावर ठाम होते. अखेर आमदार सुभाष देशमुख यांनी देखील शेतकऱयांची व्यथा जिल्हाधिकाऱयांपर्यंत पोहचविली. पण प्रतिबंधात्मक क्षेत्रात भावनिक विचार करता येत नाही. जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा नाही, अशी समजूत काढून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱयांचा मार्ग मोकळा झाला.
येथीलशेतकऱयांच्याद्राक्षांचेनुकसान
वांगी, येळेगाव, शिरपनहळ्ळी, मुंडेवाडी, वाघोली, बंकलगी, तेलगाव, सादेपूर, भंडरकवठा, बरूर, निंबर्गी, विंचूर, औराद, संजवड, राजूर, सुलेरजवळगे, नंदूर या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यातील शेतकऱयांच्या द्राक्षांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
दररोज15 टनबेदाण्याचीनिर्मिती
दिवसभर हे बेदाणे उन्हात वाळविणे, त्यानंतर एका बॉक्समध्ये 15 किलो बेदाणे असे एकूण रात्री साधारण 1 हजार बॉक्स तयार करण्यात येत होते. हा तयार माल थेट विक्रीसाठी बाजारात पाठविण्यात येतो. दिवसभरात 15 टन मालावर प्रक्रिया होत असे.
अशीहोतेद्रांक्षावरप्रक्रिया..
शेतकरी द्राक्षे कट करून टेमधून वाहतूक करून प्लांटवरील नेटवर 12 ते 15 दिवस वाळविण्यात येते. या कालावधीत चांगल्या पध्दतीने डिपिंग ऑईल फवारणी करतात. नेटींग मशिनमध्ये घालण्यात येते. एक नंबर, दोन नंबर माल व कचरा विलगीकरण करून विक्रीसाठी स्वच्छ माल काढण्यात येते.