प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील एका गावात फिर्यादीच्या सुनेसोबत गावातील दोघांनी अनैतिक संबंध ठेवल्याने फिर्यादीच्या मुलाची गावात बदनामी होत असल्याने आणि पत्नी सतत भांडण करत असत या त्रासाला कंटाळून फिर्यादीचा मुलगा राम महिपती सोलंकर वय ३२ यांने दि ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. फिर्यादीने मुलाच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिघांवर दि ११ रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात फिर्यादीच्या सुनेसोबत त्याच गावातील दोन पुरुषांनी अनैतिक संबंध ठेवल्याने फिर्यादीच्या मुलाचे गावात बदनामी होत होती. आणि पत्नी सोबत सतत कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याने मयत
राम महिपती सोलंकर वय ३२ यांने दि ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या मृत्यूस जबाबदार संशयित सून, शंकर बसवराज बिराजदार व तानाजी दिगंबर सोलंकर सर्व बादोले ( बु ) यांच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी मयताच्या पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भाविकट्टी हे करीत आहेत.