तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधयके राज्यसभेत मंजूर केली आहेत. ही विधयके शेतकऱ्यांना कंपन्यांचे गुलाम बनविणारी आहेत. सरकार शेतक-यांच्या शेतीमालास हमीभाव व इतर जबाबदा-यांतुन बाजुला जाण्याचा प्रयत्न करीत आहे. विधेकाबाबत शेतक-यांमधून रोष व्यक्त केला जात असून पंढरपूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विधेकाची होळी करुन शेतकरी विरोधी धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकरी वियेकाविरोधात देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या विधेयकास विरोध दर्शविला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे समन्वयक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी.खा.राजु शेट्टी यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी कायद्यांच्या विरोधात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, धनुआबा पाटील, सोमनाथ सुर्वे, आप्पा चोरमले, शहाजहान शेख, नाना चव्हाण, सोमनाथ घोगरे, रणजित बागल, अतुल गायकवाड, बापु शिंदे, अतुल कारंडे, अजर महानवर, सचिन ताटे, पार्थ सुरवसे, मनोज गावंधरे, सुशिल शिंदे, संजय बागल, आबा शिंदे, कांतीलाल बागल आदी उपस्थित होते.