प्रतिनिधी / महाबळेश्वर
तब्बल १६ वर्षानंतर फुललेल्या सपुष्प या कारवी जातीच्या फुलांच्या बहराची सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पाहणी केली. या कारवीच्या दुर्मिळ जातीच्या फुलांचे संरक्षण आणि संवधर्न व्हावे यासाठी या फुलांचे परागीभवन होणे आवश्यक आहे. त्या करीता वन विभागाने दोन महत्वाचे पॉइंट पयर्टकांसाठी बंद केले आहेत. पश्चिम घाट तथा सहयाद्री डोंगररांगात कारवीच्या विविध जाती आढळतात. या कारवीच्या जाती दरवर्षी उगवतात परंतु त्यांना दरवर्षी फुले येत नाहीत. तर काही जातींना दर दोन तर काही जातींना पाच, सात, बारा वर्षांनी बहर येतो. परंतु या कारवीच्या सुपुष्प या जातीच्या वनस्पतींला फुलांचा बहर आला आहे.
या दुर्मिळ जातीचे संरक्षण आणि संवधर्न व्हावे तसेच या फुलांचे परगीभवन व्हावे या उद्देशाने वन विभागाने ज्या भागात सुपुष्पच्या फुलांचा बहर आला आहे. त्या परीसरातील कॅसल रॉक व सावित्री हे दोन महत्वाचे पॉईंट पयर्टकांसाठी बंद केले आहेत. या फुलांचा बहर येवुन एक आठवडा झाला असुन पुढील एक आठवडा या फुलांचा बहर राहील त्या नंतर फुले झडुन त्यांचे बियांमध्ये रूपांतर होईल. हे बी जमिनीवर पडेल परंतु त्यांना पुन्हा १६ वर्षा नंतरच फुले येतील. अशा या वैशिष्टयपुर्ण सुपुष्प कारवी फुलांच्या बहराची सातारा जिल्हाधिकारी शेखरसिह यांनी पाहणी केली.