प्रतिनिधी/ महाबळेश्वर
कोरोनाच्या पाश्वभुमीवर देशात लागु केलेल्या लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे लॉकडाउनमुळे अनेकांना आपले लग्न पुढे ढकलणे भाग पडले आहे मात्र उपसभापती संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाने आचली ता + महाबळेश्वर येथे एका जोडप्याने सोशल डिस्टन्स ठेवुन अगदी काही मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीने आपली लगीनगाठ बांधली आहे
गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो त्या मुळे गदी होणारे सर्वच कार्यक्रमावर शासनाने निर्बंध घातले आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन शासनाने केलेल्या आवाहना नुसार अनेकांनी आपले विवाह पुढे ढकलले आहेत मालुसर येथील गेणु तुकाराम पवार यांची कन्या चंदा व आचली येथील रमेश हबाजी गायकवाड यांचे चिरंजीव गणेश यांचा विवाह लॉकडाउन लागु होण्यापुर्वीच निश्चित झाला होता लग्नाची बरीचशी तयारी पुर्ण झाली होती दोन्ही घरच्यांनी बस्ता बांधुन तयार ठेवला होता परंतु देशात लॉकडाउन लागु झाल्याने गणेश व चंदा यांचा विविह ही अडचणीत आला होता दोन्ही घरी लग्न पुढे ढकलण्या बाबत चर्चा सुरू होती अशातच उपसभापती संजय गायकवाड यांनी या लग्नात पुढाकार घेतला व दोन्ही घरातील मोजकीच मंडळींच्या साक्षीने व सोशल डिस्टन्स ठेवुन हे लग्न लॉकडाउन कालावधीतच करण्याचा निर्णय घेतला मुलाचे व मुलीचे आई वडील मामा काका व काकी यांच्या प्रमुख उपस्थितीत मास्क लावुन व सोशल डिस्टन्स ठेवुन हा शुभविवाह पार पडला उपसभापती संजय गायकवाड हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात सध्या त्यांनी गोरगरीब मजुर व हातावर पोट अलेल्या लोकांसाठी मुठभर तांदुळ हा उपक्रम हाती घेतला असुन या उपक्रमाला तालुक्यातुन मोठा प्रतिसाद लाभत आहे
या विवाहा बाबत बोलताना उपसभापती संजय गायकवाड म्हणाले की आपला जिल्हा ऑरेज झोन मधुन आता रेड झोन मध्ये गेला आहे त्या मुळे कोरोनाचे हे संकट कधी टळेल हे आज तरी सांगता येत नाही त्या मुळे हा विवाह ठरलेल्या तारखेलाच करण्याचा निर्णय आम्ही घेतला परंतु या लग्नाला गर्दी होणार नाही याचीही आम्ही खबरदारी घेतली तसेच शासनाने सांगितल्या प्रमाणे आम्ही सोशल डिस्टन्स राखला होता तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होवुनये याची आम्ही योग्य ती खबरदारी घेतली होती