जिल्हाधिकाऱयांनी बजावला आदेश : कोरोनाचे नियम पाळतच घ्यावे लागणार दर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे आता मंदिरे खुली करण्याबाबत जिल्हाधिकाऱयांनी पाऊल उचलले आहे. मंगळवारी जिल्हय़ातील चार मंदिरे खुली करण्याबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आदेश दिला होता. त्यानंतर बुधवारी सौंदत्ती येथील रेणुका मंदिरही भक्तांसाठी खुले करण्याचा आदेश दिला असून कोरोनाचे नियम पाळत भक्तांनी दर्शन घ्यावे. तसेच पुजाऱयांनीही कोरोना नियमांचे गांभीर्याने पालन करावे, असे या आदेशात म्हटले आहे.
कोरोनामुळे जिल्हय़ातील काही प्रमुख मंदिरे अजूनही बंद होती. भक्तांनी मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत, अशी मागणी केली होती. याबाबत सरकारकडे पाठपुरावाही करण्यात आला होता. त्यानुसार सरकारनेही त्याची दखल घेतली असून जिल्हाधिकाऱयांना मंगळवारी श्री जोगुळभावी-सत्यम्मा देवी देवस्थान-सौंदत्ती, श्री मायाक्का देवी-चिंचली (ता. रायबाग), श्री होळेम्मा देवी-बडकुंदी (ता. हुक्केरी), मल्लय्या देवस्थान-मंगसुळी (ता. कागवाड) ही मंदिरे भक्तांसाठी खुली करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
बेळगाव जिल्हय़ातील एक अत्यंत महत्त्वाचे मंदिर म्हणून सौंदत्ती येथील रेणुका मंदिराकडे पाहिले जाते. त्या ठिकाणी भक्तांचा नेहमीच ओढा असतो. मोठय़ा प्रमाणात यात्राही भरते. महाराष्ट्र, गोवा येथील भक्तही येत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. आता जिल्हाधिकाऱयांनी मंगळवार दि. 28 पासून हे मंदिर सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे भक्तांना तसेच त्या परिसरातील व्यापाऱयांना दिलासा मिळाला आहे.
बेळगाव जिल्हय़ात पहिल्या टप्प्यामध्ये चार मंदिरे खुली करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता रेणुकादेवी मंदिरही खुले करण्यात येणार आहे. मंदिरे खुली करण्यात आली तरी नियम व अटी लादण्यात आल्या आहेत. याचबरोबर कोणत्याही प्रकारची यात्रा, उत्सव, रथोत्सव, पूजाअर्चा सांकेतिक स्वरुपातच करावी. होमहवन देखील अत्यंत मोजक्मयाच पुरोहितांच्या उपस्थितीत पार पाडावे, दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी तसेच पुजाऱयांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, याचबरोबर सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. मंदिरामध्ये सोडताना थर्मल स्क्रिनिंग केलेच पाहिजे, असे या आदेशात म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा मंदिरे बंद करण्याबाबतही विचार केला जाईल. याचबरोबर सरकारच्या आदेशाचे पालन प्रत्येकानेच केले पाहिजे, असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.