प्रतिनिधी/ बेळगाव
भारतीय रेल्वेने सौर उर्जेतून 1 हजार मेगावॅट तर पवन उर्जेतून 200 मेगावॅट विजनिर्मितीचे उदिष्ट ठेवले आहे. या उपक्रमातंर्गत नैऋत्य रेल्वे 128 रेल्वेस्थानकांवर रूफ टॉप पॅनेल बसविणार आहे. रेल्वे स्थानक छतावर तसेच कार्यालयांवर पॅनेल बसवून रेल्वे विभागत विजनिर्मिती करणार आहे. यामुळे वीजेच्या बाबतीत रेल्वे विभागात स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे.
सन 2021 – 22 या वर्षापर्यंत सर्व झोनमध्ये रेल्वे विभाग सोलार पॅनेल बसविणार आहे. नैऋत्य विभागात 4.37 मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे ठरविण्यात आले आहे. म्हैसूर, बेंगळूर, हुबळी, यशवंतपूर, होसपेट, गदग, बेळ्ळरी या प्रमुख रेल्वेस्थानकांसोबत 7 कार्यालयांवर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. नैऋत्य रेल्वेचे दरवर्षीचे 1 कोटी 88 कोटींच्या आसपास येते. या सोलार पॅनेलमुळे विजेची बचत होणार असल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे.