लखनौ : उत्तरप्रदेशमधील कौशांबी येथे लग्न समारंभ आटोपल्यानंतर वऱहाडींना घेऊन परतणाऱया एका स्कॉर्पिओवर मालवाहतूक करणारा ट्रक उलटल्याने 8 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवेळी स्कॉर्पिओमधील केवळ दोघांचा जीव वाचला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कौशांबीच्या कडाधाम पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी हा भीषण अपघात झाला. देवीगंज येथे लग्न समारंभ आटोपल्यानंतर एका स्कॉर्पिओमधून सहा-सात महिला आणि मुले घरी परतत होते. ही कार देवीगंज चौकात उभी असताना वाळूची वाहतूक करणारा ट्रक कारवर उलटला. अपघातात कारमधील सहा महिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
Previous Articleब्रिटनकडून लसीची आनंदवार्ता!
Next Article गणतंत्र दिनाचे बोरिस जॉन्सन यांना आमंत्रण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.