ख्रिस्ती बांधवांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
मावोवादी गटाशी संबंध असल्याचा आरोप करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्टॅन स्वामीसारख्या एका ज्ये÷ सामाजिक कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. याचबरोबर मानवाधिकार रक्षक असलेल्या अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्साल्वीस, वरवरा राव, आनंद तेलतुंबे, तौम नवलाखा, हनी बाबू, ज्योती जगताप, सागर गोरखे यांना देखील अटक करण्यात आली आहे. हे समाज विघातक आहे. खोटे आरोप करून अशाप्रकारे कारवाई करणे योग्य नाही. तेंव्हा तातडीने त्यांची सुटका करावी, याचबरोबर आरोप मागे घ्यावेत, अशी मागणी बेळगाव येथील जेज्वीट समाज, विविध ख्रिस्ती धार्मिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरणात हात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही खरोखरच खेदाची बाब आहे. स्टॅन स्वामी हे गेली पाच दशके झारखंडमधील आदीवासींसाठी काम करत आहेत. त्यांना सामाजिक आणि धार्मिक न्याय देण्यासाठी लढत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी विविध विकासात्मक धोरणे राबविली आहेत. स्टॅन स्वामी हे आदीवासींसाठी काम करत असताना त्यांच्यावर खोटे आरोप करून अटक करण्यात आली.
झारखंडमध्ये पोलिसांकडून आदीवासी जमातींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. त्या विरोधात त्यांनी आवाज उठविला आहे. असे असताना 8 ऑक्टोबर 2020 रोजी स्टॅन स्वामी यांना अटक करण्यात आली आहे. हे बेकायेदशीर आहे. ते वृद्ध असताना व त्यांची तब्येत ठिक नसतानाही अटक करण्यात आली. यामुळे ख्रिस्ती बांधवांतून त्याचा निषेध नोंदविण्यात आला आहे.
तातडीने त्यांच्यासह इतरांची सुटका करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी बिशप डेरीक फर्नांडिस, रॉनी डिसोजा, संतोष वाझ, सदाशिव परेरा, साबीओ ऑब्रिओ, मारिया फर्नांडिस, लुईस रॉड्रीग्ज यांच्यासह ख्रिस्ती बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.