नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. यामध्ये ग्राहकांच्या खात्यांमध्ये कमीतकमी रक्कम नसणे किंवा एटीएममधून पैसे काढताना व्यवहार अयशस्वी झाल्यावर ग्राहकांना दंडात्मक शुल्क द्यावा लागणार असल्याची माहिती आहे. या अगोदरपासून आयसीआयसीआय, एचडीएफसी, यस बँक, कोटक महिंद्रा, ऍक्सिस बँक यांनी आपले नवे नियम लागू केले आहेत. एसबीआय वेबसाईटच्या माहितीनुसार खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक ठेव नसल्यास ग्राहकांनी एटीएम व्यवहार केल्यास त्यांना 20 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सोबत जीएसटीही भरावा लागणार आहे.