प्रतिनिधी / पणजी
राज्यातील केवळ राष्ट्रीयकृत आणि काही अर्बन सोसायटी वगळता अन्य सर्व आर्थिक संस्था बंद असल्यामुळे लोकांना होणारे त्रास कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय स्टेट बँकेतर्फे मोबाईल एटीएम चालू करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते सोमवारी या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. ही सेवा राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि पंचायत पातळीवरसुद्धा लोकांना उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारची सेवा सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्टेट बँकेचे अभिनंदन केले. या माध्यमातून राज्यातील प्रमुख मार्केट परिसर, औद्योगिक वसाहती, ग्रामीण भागात लोकांना चांगली द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.