प्रतिनिधी / कोल्हापूर
माझं कोल्हापूर माझा रोजगार अंतर्गत स्थानिकांना रोजगार देण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन आ.ऋतुराज पाटील यांनी केले .
उद्योगधंद्यातील समस्या , कोल्हापूरातील स्थानिक कामगारांना रोजगाराच्या संधी याबाबत आमदार ऋतुराज पाटील आणि शिरोली एमआयडीसी येथे स्मॅकच्या पदाधिकारी आणि संचालक यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये स्थानिकांना रोजगार देण्याबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका दर्शवली.
या बैठकीत बोलताना आ.पाटील म्हणाले , पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पने मधून ‘माझं कोल्हापूर, माझा रोजगार’ यामाध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात,यासाठी पुढाकार घेतला आहे. औद्योगिक वसाहतीत काम करणारे 20 हजारांहुन कामगार घरी गेले आहेत.मनुष्यबळ तुटवडा आहे,पण थांबून चालणार नाही. माझ कोल्हापूर , माझ रोजगार अंतर्गत 15 हजाराहून अधिक स्थानिक लोकांनी नोकरीसाठी बायोडाटा पाठवला आहे. त्याचे योग्य वर्गीकरण करून योग्य नोकरी साठी प्रयत्न सुरू आहेत . कामगारांचे ट्रेनिंग, स्किल डेव्हल्पमेंट यासाठी आपण पुढाकार घेऊ, फक्त आपणास काय हवं ते सांगावे असेही उद्योजकांना आमदार ऋतुराज यांनी सूचित केलं.बैठकी दरम्यान स्मॅक तर्फे उद्योगधंद्यातील अडचणी, या क्षेत्राच्या विकासासाठी उपयोजना, तसेच परप्रांतीय कामगारांचा क्वांरंटाइन कालावधी तसेच, इतर राज्याप्रमाणे वीजवरील स्थिर आकार रद्द करा.
मागण्यांच निवेदन आमदार ऋतुराज पाटील यांना देण्यात आलं. याबाबत योग्य पाठपुरावा करू असे आ.पाटील यांनी संगीतले.
स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी स्थानिक कामगारांची इच्छाशक्ती कमी आहे, ती वाढवण्यासाठी आपण त्याच प्रबोधन आपण करावं, अशी विनंती केली. स्मॅकचे उपाध्यक्ष दिपक पाटील यांनी, औद्योगिक उद्योगधंदे चालू झालेत पण ते पूर्ण क्षमतेने चालू झाले नाहीत, ते पूर्ण क्षमतेने सुरू करावेत, असा मुद्दा उपस्थित केला. नीरज झंवर यांनी मोठ्या कंपन्या, आंतरराष्ट्रीय कंपन्या कोल्हापुरात येण्यास इच्छुक आहेत त्यांना येण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवे असा मुद्दा उपस्थित केला. यासर्व मागणी व सूचनांवर विचार करून, उपयोजना करू. यासह कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया, असा विश्वास आमदार ऋतुराज यांनी व्यक्त केला. तसेच ज्यांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत त्या स्थानिकांचे प्रबोधन तसेच त्यांना माहिती देण्याआठी लवकरच तज्ज्ञांना सहभागी करून वेबिनर घेण्यात येणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. या बैठकीस जयदीप चौगुले,सोहन शिरगावकर , एम.वाय.पाटील , राजू पाटील, अमर जाधव, प्रशांत शेळके, जयदत्त जोशीलकर, भरत जाधव यांच्यासह प्राचार्य डॉ.महादेव नरके, शशांक मोरे, मकरंद काइंगडे आदी उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी वाळू वर्गीकरण केंद्र तसेच स्मॅकच्या आय.टी.आय.ला भेट देऊन माहिती घेतली.यामुळे प्रदूषण करणे आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल, असे आ.पाटील यांनी सांगितले.