ऑनलाईन टीम / मुंबई :
महाविकास अघाडी सरकारमध्ये सुरू असलेला वाद थांबणार नाही. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये सत्तेत असूनही काँग्रेस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पटोले म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेसला एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. त्यादृष्टीनेकॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार आम्ही वाटचाल करणार असून, आघाडी सरकारमध्ये असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढवणार आहे.
दरम्यान, काँग्रेस आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आघाडीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार, असा प्रश्न पटोले यांना विचारला असता, त्यांनी ही निवडणूक तीन वर्षांनंतर आहे. त्यावेळी पक्ष हायकमांड यावर निर्णय घेईल, असे सांगितले.