काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी / पणजी
सामान्य जनतेला विविध कामांसाठी लागणाऱया स्पॅम्प पेपरची किंमत वाढवणारे विधेयक सरकारने विधानसभा अधिवेशनात संमत पेले असून ते अन्यायकारक असल्यामुळे राज्यपालांनी त्यास मान्यता देऊ नये, अशी मागणी काँग्रेस प्नाक्षाने केली आहे. सरकारने अधिवेशनात घटना पायदळी तुडवून तिचा खून केला आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.
काँग्रेसचे प्रवक्ते रोहित ब्रास डिसा आणि ट्रॉजन डिमेलो यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की. स्टॅम्प पेपरचे विधेयक आणताना बार असोसिएशनला (वकील संघटना) विश्वासात घेतलेले नाही तसेच चर्चा करण्यात आलेली नाही. तो विषय सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून त्याचा फटका सामान्य लोकांना बसणार आहे. सरकारचा महसूल वाढावा म्हणून जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार असून तो निषेधार्ह असल्याचे मत श्री. डिसा यांनी व्यक्त केले. राज्यपालांनी याची गंभीर दखल घेऊन त्या विधेयकास अनुमती देऊ नये आणि ते परत पाठवावे, असेही ते म्हणाले.
घटनेचे पालन करण्याची शपथ घेतलेल्या भाजपच्या मंत्री, आमदारांनी व सरकारने तिचा विधानसभेत खून केला असून कोविडवरील चर्चाही नाकारण्यात आली आणि स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आला. कोरोनाचे नियंत्रण करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून उलट ती महामारी वाढण्यास सरकार कारणीभूत ठरले आहे, अशी टीका श्री. डिमेली यांनी केली. कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने त्वरित वैद्यकीय तज्ञांचे पथक स्थापन करून उपाययोजना आखावी, अशी मागणी त्यांनी केली.
माहिती आयोगाने दोन आयुक्ता निवृत्त झाले तरी त्यांची जागा भरण्याचे भान या सरकारला नाही. आरटीआय अंतर्गत माहिती मागणारी अनेक पत्रे प्रलंबित असून जनतेला माहिती नाकारण्यात येत असल्याचा आरोप श्री. डिमेलो यांनी केला आहे.