कलम 370 रद्द केल्याच्या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमध्ये एका मशिदीजवळ स्फोट झाल्याने खळबळ निर्माण झाली. श्रीनगरच्या नौहट्टा भागातील जामिया मशिदीजवळ हा स्फोट झाला. तसेच बारामुल्ला येथे सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचा प्रकारही घडला आहे. दिवसभरात या घटनांनी एकच गोंधळ उडाला. दोन वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट या दिवशी जम्मू-काश्मीरशी संबंधित वादग्रस्त कलम 370 हटवण्यात आले होते. त्याचमुळे काही समाजकंटकांनी स्फोट आणि गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
श्रीनगरनजिकच्या जामिया मशिदजवळ गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास स्फोट झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. हा स्फोट झाल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. आयईडीच्या माध्यमातून हा स्फोट घडविण्यात आला असला तरी तो कमी तीव्रतेच्या स्फोटकांचा असल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. या स्फोटानंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलीस दलाकडून या घटनेचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कुपवाडा जिल्हय़ात एक स्फोट झाला होता. त्यात 19 वषीय तरुणीचा मृत्यू झाला होता. तरुणी आपल्या आईसोबत भाजी आणण्यासाठी गेली असताना स्फोट झाला. या स्फोटात तरुणीची आई गंभीर जखमी झाली होती.
बारामुल्लात दहशतवाद्यांचा पोलीस पथकावर गोळीबार
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिह्यातील सोपोर भागात दहशतवाद्यांनी एका पोलीस पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात कोणीही ठार किंवा जखमी झाले नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. उत्तर काश्मीर जिह्यातील बाटपोरा येथे सकाळी 10.20 वाजता एका पोलीस पथकावर गोळीबार करण्यात आला. यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. दरम्यान, कलम 370 रद्द केल्याच्या निषेधार्थ सदर परिसरात संपूर्ण बंद पाळण्यात आलेला आहे.
दोन वर्षांपूर्वी हटवले होते कलम 370
आजपासून ठीक 717 दिवसांपूर्वी भारतीय संसदेचे कनि÷ सभागृह लोकसभेत संविधानाचे कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. 72 वर्षांपासून जम्मू-काश्मीर आणि देशामध्ये कलम 370 मुळे अंतर होते. दोन वर्षांपूर्वी याच दिवशी ते हटवून इतिहास रचल्यानंतर काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्याची दुसरा वर्धापनदिन साजरा होत असताना गोळीबार-स्फोटाच्या घटनांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दहशतवादाच्या घटनांमध्येही घट
कलम 370 हटवल्यापासून दहशतवादाच्या घटनाही कमी झाल्या आहेत. ऑगस्ट 2017 ते जुलै 2019 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 129 नागरिक मारले गेले असून सुरक्षा दलाचे 211 जवान हुतात्मा झाले आहेत. याचदरम्यान 509 दहशतवादीही मारले गेले आहेत. कलम 370 हटवल्यानंतर ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2021 पर्यंत 66 नागरिकांचा मृत्यू झाला, म्हणजेच 49 टक्के घट झाली. तसेच सुरक्षा दलांचे 131 जवान हुतात्मा झाले आहेत. या दोन वर्षांच्या कालावधीत दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये पूर्वीपेक्षा बरीच घट झालेली आहे.