वर्ष 2026 पर्यंतसाठी भाकीत: संशोधनातून माहिती समोर
नवी दिल्ली
ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधांसहच्या मोबाईल फोनच्या विक्रीत वृद्धी झाल्याने स्मार्टफोन वापरणाऱया युजर्सची संख्या वाढत आहे. भारतामध्ये वर्ष 2021 पर्यंत मोबाईल फोनचे 1.2 अब्ज वापरकर्ते होते. ज्यामध्ये 75 कोटी मोबाईलचा वापर करत असल्याची माहिती डेलॉयट यांच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
डेलॉयटच्या अहवालानुसार 2022मध्ये ग्लोबल टीएमटी तंत्रज्ञान, मीडिया आणि मनोरंजन, दूरसंचार या क्षेत्रामधील अंदाजानुसार देशातील बाजारात 2026 पर्यंत स्मार्टफोनचा वापर करणाऱया लोकांची संख्या वाढून एक अब्जच्या घरात पोहोचणार असल्याचा अंदाज मांडला आहे.
वर्ष 2021 ते 2026 च्या दरम्यान ग्रामीण क्षेत्रामध्ये वर्षाच्या आधारे स्मार्टफोन ग्राहकांची संख्या ही 6 टक्क्यांच्या दराने वधारत गेली आहे. तसेच शहरी क्षेत्रात वर्षाच्या आधारे ही वाढ 2.5 टक्क्यांवर राहिली आहे. डेलॉयटच्या विश्लेषणानुसार भारतामधील स्मार्टफोनची मागणी वर्षाच्या आधारे पाहता सहा टक्क्यांनी वधारुन 2026 मध्ये 40 कोटी होणार असून हा आकडा 2021 मध्ये 30 कोटीवर राहिल्याची नोंद आहे.