प्रशासनाबरोबर नागरिक ही जबाबदार
बेळगाव : कोणत्याही शहराच्या विकासात आणि सौंदर्यात अधिक भर घालते ते म्हणजे दळणवळण आणि त्यासाठी उभारण्यात आलेल्या सुविधा. यामध्ये प्रामुख्याने बस स्टॅन्ड, बसेस व शहरात ठीकठिकाणी उभारण्यात येणाऱ्या बस थांब्यांचा समावेश होतो. मात्र स्मार्ट सिटी मध्ये समावेश असलेल्या बेळगाव शहरातील या बस थांब्यांची मात्र अक्षरशः दुरावस्था झाली आहे.
केंद्र सरकारने 2015 मध्ये स्मार्टसिटी मिशन सुरू केले आहे. स्मार्ट सिटी मिशन योजनेतून देशातील 100 शहरांचा कायापालट करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यात बेळगाव शहराचाही समावेश आहे. मूलभूत सुविधांबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे काम आहे. मात्र सध्या याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे
स्मार्ट सिटी मध्ये समावेश असलेल्या बेळगाव शहरातील या बस थांब्यांची मात्र अक्षरशः दुरावस्था झाली आहे. मूलभूत सुविधांबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे काम आहे. मात्र सध्या याकडे दुर्लक्ष झाले असून बस मोडकळीला आले आहेत तर काही ठिकाणची आसनेच गायब आहेत. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यापासून प्रवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
आता याला जसे प्रशासन जबाबदार आहे तसे नागरिक ही जबाबदार आहेत. सार्वजनिक ठिकाणांवर चांगली वर्तवणूक ठेवणे ही प्रत्येक बेळगावकराची जबाबदारी आहे. पण ही जाणीव कुठेतरी लोपपावत चालल्याचे चित्र आहे.