रस्ता बनला केवळ 30 फुटाचा : वाहतूक कोंडी होण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बेळगाव- वेंगुर्ला रोडपासून सहय़ाद्रीनगरला जाणाऱया रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. सदर रस्ता 60 फुटाचा असून, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ व सायकल ट्रक करण्यात आल्याने हा रस्ता निम्मा बनला आहे. तसेच रस्त्याच्या मध्यभागी पथदीप आल्याने रस्ता अरुंद बनल्याच्या तक्रारी होत आहेत.
बुडाने निर्माण केलेल्या वसाहतीमधील रस्त्याचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. रहदारी व येथील वाहनांची संख्या याचा विचार करून गणपती मंदिरपासून संहय़ाद्रीनगरला जोडणाऱया रस्त्याची रुंदी 60 फूट ठेवली होती. आतापर्यंत या रस्त्याचा वापर नियमितपणे होत आहे. संहय़ाद्रीनगर, विद्यानगर, कुवेंपूनगर, पार्वती लेआऊट तसेच बॉक्साईट रोडला हा रस्ता जोडला जातो. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. अवजड वाहनांसह बसफेऱया देखील होत असतात. पण हा रस्ता अरुंद बनल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.
रस्ता रुंद असणे गरजेचे
ही वसाहत बुडाने निर्माण केली होती. भविष्यात वाहनांची संख्या वाढण्याची शक्मयता गृहीत धरून हा रस्ता 60 फुटाचा करण्यात आला होता. मात्र स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याच्या निम्म्या भागात फुटपाथ व सायकल ट्रक निर्माण करण्यात आले आहेत. सध्या असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी पथदीप उभारण्यात आले आहेत. त्यामुळे हा रस्ता केवळ 30 फुटाचा बनला आहे. येथील विविध वसाहती आणि वाहनांची संख्या पाहता रस्ता रुंद असणे गरजेचे आहे. पण स्मार्ट सिटीच्या उपक्रमामुळे हा रस्ता अरुंद बनला आहे.
या रस्त्याशेजारी व्यावसायिक आणि रहिवासी संकुले आहेत. रस्त्यावर पार्किंगची सुविधा नसल्याने एखादे वाहन रस्त्याशेजारी पार्क केल्यास निर्माण करण्यात येत असलेल्या अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुसऱया बाजुला फूटपाथ व सायकल ट्रक किंवा अन्य उपक्रम राबविण्यापूर्वी रहदारीचा विचार करावा, अशी मागणी होत आहे. तसेच रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने तातडीने पूर्ण करून रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची मागणी होत आहे.