प्रतिनिधी / बेळगाव
शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली झाडे तोडण्यात येत आहेत. येथील उद्यमबाग केएलई कॉलेज समोरील रस्त्यावर झाडांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी नको पण ग्रीन सिटी हवी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या मोठमोठय़ा झाडांच्या फांद्या विकासाच्या नावाखाली तोडण्यात येत आहेत. विद्युततारेला झाडाचा स्पर्श होऊन एखादा अनर्थ घडण्याची शक्मयता आहे अशा ठिकाणच्या फांद्या तोडण्याऐवजी दुसऱया ठिकाणच्या फांद्या तोडण्याचा घाट अनेकांनी चालविला आहे. त्यामुळे शहरातील झाडांचे अस्तित्व नष्ट झाल्याचे निदर्शनास येत आहे.
सध्या उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना फुटपाथवरून जाताना या झाडांच्या सावलीचा आसरा मिळत होता. मात्र, येथील झाडे अशाप्रकारे का आणि कशासाठी तोडण्यात आली आहेत हे उमगत नसल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.