सामाजिक कार्यकर्ते करणार निदर्शने, सामाजिक अंतर पाळून पुष्पहार घालू देण्याची मागणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू यामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर भाविक, पर्यटकांना बंदी असली तरी तेथील नैमित्तिक कामे बंद केली जात नाहीत़ मंदिरांमधील पूजा ही बंद करण्यात आलेली नाह़ी तथापि लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानी असलेल्या पुतळ्याला पुष्पहार घालायला मात्र पुरातत्व खात्याने बंदी घातली आह़े याविरूद्ध सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आह़े
मार्चच्या अखेरीस जाहीर झालेल्या टाळेबंदीपासून कधीही धार्मिक स्थळांमधील पूजा, अर्चा व विधींना बंदी घालण्यात आलेली नाह़ी भाविकांना दर्शनासाठी ते बंद करण्यात आल्याचे आदेश जारी झाले होत़े मशिदींमधील ध्वनीवर्धकांना परवानगी राहील, असे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होत़े
असे असताना पुरातत्व खात्याच्या कर्मचाऱयांनी रत्नागिरी शहरातील सामाजिक कार्यकर्त्याना सांगितले की, उद्या 1 ऑगस्ट रोजी टिळक जन्मभूमीची कुलुपे बंद राहतील़ कोणत्याही परिस्थितीत ती उघडण्यात येणार नाह़ी 1 ऑगस्ट रोजी टिळक पुण्यतिथी असून यावर्षी देश त्यांची स्मृति शताब्दी साजरी करत आह़े दरवर्षी रत्नागिरीत सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय नेते, महाविद्यालयीन विद्यार्थी टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करत असतात़
यावर्षी कोरोनामुळे गर्दी किंवा जमाव करणे अनुचित असले तरी सामाजिक अंतर पाळून एकेका व्यक्तीने टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे योग्य ठरेल असे रत्नागिरीतील रहिवाशांनी सांगितल़े शासनाने टिळक जन्मभूमी बंद ठेवणे चुकीचे आह़े गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन बाजार उघडायला परवानगी मिळते पण 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथी दिवशी एक दिवस जन्मभूमी का उघडी ठेवली जात नाही, असा सवाल करण्यात आला आह़े
आंदोलन करणार
लोकमान्य टिळकांच्या स्मृति शताब्दी वर्षात 1 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी दिवशी पुष्पहार अर्पण करणे आम्ही अत्यावश्यक मानत़ो स्वखर्चाने आम्ही ते कऱू शासनाने त्याची कवाडे बंद ठेवणे हे चुकीचे आह़े असे झाल्यास उद्या 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 व़ा काळी फित लावून जन्मभूमी समोर निदर्शने कऱू
– बाळा जोशी
सामाजिक कार्यकर्ते टिळ कआळी रत्नागिरी.