गटारी तुंबल्याने माजी नगरसेवकाचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
श्रीनगर व महातेंश नगर परिसरात स्मार्टसिटी योजनेतील कामे व्यवस्थित होत नसल्याने स्वच्छता नागरी सुविधा उपलब्ध करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच कचऱयाची उचल वेळेवर केली जात नाही. तसेच गटारीची स्वच्छता केली जात नसल्याने गटारी तुंबून सेक्टर क्रमांक सात परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तातडीने स्वच्छता करावी अन्यथा स्वच्छता करून काढण्यात आलेला कचरा मनपाला भेट देवू असा इशारा माजी नगरसेवक डॉ.दिनेश नाशीपुडी यांनी दिला आहे.
शहराची वाटचाल स्मार्टसिटीकडे होत असून महातेंश नगर आणि श्रीनगर परिसराची निवड स्मार्टसिटी योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. श्रीनगर व महातेंश नगर परिसरात स्मार्टसिटी योजनेअंतर्गत विविध विकासकामे राबवून स्मार्ट करण्यात येत आहे. पण येथील काही विकासकामे अद्यापही करण्यात येत आहेत. पण सदर विकासकामे राबविताना कोणतेच नियोजन नसल्याने गटारीत जलवाहिन्या आणि विविध वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. अशातच गटारीची स्वच्छता करण्यात येत नाही. ठिकठिकाणी गटारी तुंबल्या असून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. गटारीमधील जलवाहिन्यामुळे कचरा अडकून सांडपाणी साचून सेक्टर क्रमांक सात परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
कचऱयाची उचल आणि गटारीची स्वच्छता करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंत्राट दिले आहे. पण कचऱयाची उचल होत नसून गटारीची स्वच्छता देखील करण्यात येत नसल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. सेक्टर क्रमांक सात मधील
सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने गटारीची स्वच्छता करण्याबाबतची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही.
गटारीची स्वच्छता आणि कचऱयाची उचल करण्यात येत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत असतात. पण प्रत्यक्षात स्वच्छतेचे काम केले जात नाही. यामुळे अस्वच्छता पसरली आहे. तातडीने स्वच्छतेचे काम घेण्यात यावे तसेच गटारीमधील जलवाहिन्या हटविण्यात याव्यात. याची दखल घेतली नसल्यास सदर कचरा स्वच्छ करून महापालिकेला भेट देण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक डॉ.दिनेश नाशीपुडी यांनी दिला आहे.