इचलकरंजी : प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियानामध्ये इचलकरंजी नगरपालिकेने राज्यात दुसऱ्या क्रमाकांवर येण्याचा मान पटकावला आहे. तर देशपातळीवर ७६ वा क्रमांक मिळवला आहे. राज्य पातळीवर एकूण १३ तर देशपातळीवर एकूण ३७४ स्पर्धक होते.
नगरपालिकामधून इचलकरंजी पालिकेने दुसरे मानांकन मिळवले आहे. यासाठी नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य सभापती संजय केंगार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, विश्वास हेगडे, सुर्यकांत चव्हाण, प्रवीण बोगाळे, यांच्यासह पालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गतवेळी देशपातळीवर ११७ व्या क्रमांकावर असलेल्या इचलकरंजी पालिकेने वर्षभरातच अथक प्रयत्न करून ७६ क्रमांकावर मजल मारल्याने कौतुक होत आहे.