प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहराला स्वच्छ भारत अभियानात आता पुढे आणायचे आहे. याचाच सकारात्क संकल्प मुख्याधिकारी अभिजित बापट आणि नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी नवीन नवीन संकल्पनेच्या माध्यमातून स्वच्छता चळवळ राबवण्याचा निर्धार केला आहे. लहान मुलांमध्ये ही स्वच्छता चळवळ आधिक प्रभावी राबवण्यात यावी यासाठी लहान मुलांसाठी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या स्पर्धेचे अर्ज सोशल मीडियावर स्वतः नगराध्यक्षा माधवी कदम आणि मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी व्हायरल केले आहेत.
कोणताही उपक्रम राबवायचा असेल तर त्यासाठी सकारात्मक विचारसरणी गरजेची असते. सातारा शहराला स्वच्छतेत अग्रक्रमात आणायचा निर्धार करत विद्यमान मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तशा प्रकारे कामकाजास सुरुवात केली आहे. सगळय़ांना सोबत घेवून सकारात्मकेतून सातारा शहरात स्वच्छतेचे महत्व अधिक पटवून देण्यासाठी लहान मुलांपासून कशी सुरुवात करता येईल याकरता त्यांनी ऑन लाईन मुलांच्यासाठी मनोरंजक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे लिंक सातारा पालिकेचे पदाधिकारी स्वतः व्हायरल करत आहेत. त्यामुळे निश्चितच सातारा शहरात स्वच्छतेचे महत्व लहान मुलांमध्ये पटणार असून उघडय़ावर कचरा टाकला जाणार नाही, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्यात यावा असा संदेश घराघरात आता पोहचणार आहे. त्यामुळे सातारा शहर स्वच्छ होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली जाणार आहे.