प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयात पूर आल्यामुळे अनेक कुटुंबासमवेत विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेकांचे संसार उघडय़ावर पडलेली आहेत. घरातील सामान पूर्णपणे वाहून गेलेले आहे. यामुळे सध्यातरी दर दिवशी चार हजार जणांच्या जेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुढील आठवडय़ात ही व्यवस्था सुरूच राहणार आहे .जोपर्यंत घरातील व्यवस्था होत नाही तोपर्यंत पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था सुरूच राहणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील जवळपास शंभर घरांनहानी झालेली आहे. तर अनेक कुटुंबातसमोर विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांच्या घरातील सामान पूर्णपणे वाहून गेल्यामुळे त्यांना स्वयंपाक करता येत नाही .तर घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील स्वयंपाक घराची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली आहे .यामुळे या पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेल्या एक वेगळय़ा उपक्रमाअंतर्गत व्यवस्था करण्यात आलेली आहे. दोन दिवसापासून जवळपास चार हजार जणांना फूट पॅकेट वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे .जोपर्यंत स्वयंपाक घराची व्यवस्था होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी स्पष्ट केलेली आहे .यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करण्याची गरज नाही .वाळपई मतदारसंघांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. ज्यापद्धतीने या पूरग्रस्तांना मदत करणे शक्मय आहे त्यासंदर्भात मदत करणार असल्याचे विश्?वजित राणे यांनी स्पष्ट केले आहे. काही राजकीय पक्ष राजकारणाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्यास पुढे आलेले आहे. मात्र ही राजकीय नौटंकी असून पूरग्रस्तांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केलेली आहे . मदत करायची असेल तर लोकांच्यामध्ये राहून मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. फक्त पूरग्रस्तांना शिल्लक सामान घेऊन त्याची सवंग प्रसिद्धी घेणे हे खरोखरच खेदजनक असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे.