ऑनलाईन टीम / मुंबई
वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि आंदोलनात उतरून तडाखेबाज भाषणासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर आता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारी विचारसरणी आजही आपल्या समाजात जिवंत आहे.” असे ट्विट स्वरा भास्करने केले आहे.
३० जानेवारी १९४८ साली नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. आज गांधीजींची ७२वी पुण्यतिथी आहे. आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने स्वरा भास्कर हिने टि्वट केले.