ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरच्या लाल चौकातील ‘प्रेस एन्क्लेव्ह’ या इमारतीवर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा वाद आजवर कायम होता. मात्र, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू बदलत आहे. लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्ह इमारतीवर तिरंगा फडकल्याने देशप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, यापूर्वी लाल चौकात तिरंगा फडकवण्याचे काम 1992 मध्ये भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांनी केले होते.