मागण्या पूर्ण करण्याची मागणी,दोन स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग,विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा
प्रतिनिधी / पणजी
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना त्यांच्या पात्रतेनुसार सरकारी नोकऱया द्या, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांना एकरकमी तडजोड करा, या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून सरकारदरबारी हेलपाटे मारणाऱया स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनी दोन स्वातंत्र्यसैनिकांसह येथील आझाद मैदानावर शुक्रवारपासून उपोषण सुरु केले आहे.
उपोषणात स्वा.सै. सुरेश पारोडकर व नागेश च्यारी यांचा सहभाग असून त्यांचे वय 80 व 85 असे आहे. आमच्या मुलांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असे नागेश च्यारी यांनी सांगितले. प्राण गेले तरी चालेल आमच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचेही च्यारी म्हणाले.
आमच्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे केवळ 97 स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱया मिळालेल्या नाहीत. आमच्यावरच हा अन्याय का, असा सवाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट यांनी उपस्थित केला आहे. संप मागे घ्यावा यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे परंतु मागण्या मान्य झाल्या शिवाय उपोषण मागे नाही असा इशार शेट यांनी दिला आहे. सोपस्कार पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार हेही आम्हाला मान्य आहे. त्यासाठी सरकारने 31 मार्च पर्यंत 97 स्वातंत्र सैनिकांच्या मुलाना त्यांच्या पात्रते नुसार नोकऱया देण्यास तसेच ज्यांचे वय 50 हुन अधिक असेल त्यांची एक रक्कमी तडजोड करण्याचे लेखी आश्वासन दिल्यास उपोषण मागे घेण्यास तयार असल्याचे डॉ. शेट यांनी सांगितले.
उपोषणाच्या पहिल्याच दिवसी विरोधीपक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत, काँग्रेसचे रमाकांत खलप, संकल्प आमोणकर तसेच अमरनाथ पणजीकर यांनी उपोषणाला बसलेल्यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा जारी केले आहे. सरकार या वर्षी गोवा स्वतंत्र्याचा साठावा मोहत्सव साजरा करीत आहे. त्यासाठी कोटय़ावधी रुपये खर्च करीत आहे. साठाव्या मोहत्सवाच्या दरम्यान स्वातंत्र सैनिकांच्या मुलांना त्यांच्या मागणीसाठी संप उपोषण करावे लागत आहे यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही असे दिगंबर कामत यांनी सांगितले. मोहत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राज्यात राष्ट्रपती उपस्थित राहिले होते नंतर उपराष्ट्रपतीही गोव्यात येऊन गेले. स्वातंत्र सैनिकांच्या मुलांच्या मागणीवर तोडगा काढण्याबाबत कोणीही विचार केलेला नसल्याचे कामत यांनी सांगितले. ज्यांच्या अथक परीक्षमामुळे आम्हाला स्वातंत्र मिळाले त्या स्वातंत्र सैनिकांची मुले आपल्या हक्कासाठी रसत्यावर उतरली असून सरकार त्यांच्या मागण्यांकडे डोळेझाकपणा करीत आहे. आपण मुख्यमंत्री असताना अनेक स्वातंत्रसैनिकांच्या मुलाना नोकऱया दिलेल्या आहे. स्वातंत्र सैनिकांच्या मुलांसाठी राखीव असलेल्या जागांवर इतर वर्गातील उमेदवारांची कधीही भरती केली नसल्याचे कामत यांनी सांगितले. साठाव्या स्वातंत्र दिन मोहत्सवासाठी सरकार 100 कोटी रुपये खर्च करीत आहे. त्यातील केवळ 25 कोटी बाजूला ठेऊन उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र सैनिकांच्या मुलांचा प्रश्न सोडवता आला असता मात्र सरकार तसे करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. असे ऍड. रमाकांत खलप यांनी सांगितले. सरकार स्वतंत्र दिनाचा साठावा मोहत्सव साजरा करीत आहे मात्र या मोहत्सवात एकाही स्वतंत्र सैनिकाला निमंत्रण दिलेले नाही ही खेतजनक बाब आहे. या उलट विरोदीपक्षनेते दिगंबर कामत यांनी मडगाव लोलयेकर मैदानावर केलेल्या एका कार्यक्रमात पाच स्वातंत्र सैनिकांचा सत्कार केला आहे असेही खलप यांनी सांगितले. यावेळी अमरनाथ पणजीकर म्हणाले की सरकार 10 हजार सरकारी नोकऱया देण्याचे गोष्टी करीत आहे सरकारकला 10 हजार सरकारी नोकऱया देणे खरोखरच शक्य असेल तर त्यातील केवळ 100 नोकऱया राखीव ठेऊन त्या स्वातंत्रसैनिकांच्या मुलांना सरकार का देत नाही असा प्रश्नही पणजीकर यांनी उपस्थित केला.