प्रतिनिधी /बेळगाव
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व कन्नड रंगभूमीचे पितामह बी. व्ही. कारंथ यांच्या जन्मदिनानिमित्त नाटय़गीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील बसवराज कट्टीमनी सभागृहात रविवारी सकाळी हा कार्यक्रम झाला.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ट साहित्यिक प्रा. बी. एस. गवीमठ उपस्थित होते. रंगसंपदाचे अध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी बी. व्ही. कारंथ यांच्या बेळगाव येथील आठवणींना उजाळा दिला.
कन्नड व संस्कृती खाते, युवरंग सांस्कृतिक संस्था, रंगसंपदा बेळगाव व म्हैसूर येथील रंगायनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. बाबासाहेब कांबळे व राघव कम्मार व त्यांच्या सहकाऱयांनी नाटय़गीतांचे गायन केले. यावेळी कन्नड व संस्कृती खात्याच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री, गुरुनाथ कुलकर्णी, माहिती खात्याचे अनंत पप्पू आदी उपस्थित होते.