सांगली/प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती बँकेची शनिवार 19 मार्च रोजी विशेष सभा होणार आहे. या सर्वसाधारण सभेत मोठ्या नेत्याची 100 कोटीची कर्ज माफी केली जाणार आहेत. बँक शेतकऱ्यांची का पुढाऱ्यांची असा प्रश्र निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची कर्ज थकली की त्यांच्या जप्ती व लिलावाची कारवाई केली जाते व पुढाऱ्यांची मात्र कर्ज थकली की त्यानां माफी दिली जाते जिल्हा बँकेचे संचालक हे विविध संस्थेचे संचालक आहेत हिम्मत असेल बँकेने संचालकांची मालमत्ता जप्त करून कर्ज वसुल करावीत अन्यथा शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी. या मागणीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.