प्रतिनिधी / कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी ऊस परिषद 19 ऑक्टोंबरला दुपारी 3 वाजता जयसिंगपूरच्या विक्रमसिंह पटांगणावर होणार आहे. परिषदेस महाराष्ट्रासह सिमाभागातून हजारो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तीन टप्प्यातील एफआरपी, महापुराती नुकसान भारपाईवर परिषदेत चर्चा होणार आहे. अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकारला हातशी धरुन एफआरपीचे तुकडे पाडण्याचा कारखानदारांचा डाव उधळून लावू असा इशाराही शेट्टी यांनी दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, वैभव कांबळे, सावकर मादनाईक, रमेश भोजकर, राजेश पाटील, संदीप कारंडे आदी प्रमुख उपस्थित होते.
राज्t शेट्टी म्हणाले, गतवर्षी कोरोनामुळे मोजक्या शेतकऱयांच्या उपस्थितीत बंदिस्त जागेत ऊस परिषद घेतली मात्र यंदा कोणाचाही दबाव न घेता खुल्या मौदानात ऊस परिषद घेणारा आहे. तत्पूर्वीच कारखान्यांना हंगाम सुरु करण्याची घाई झाली आहे. कारखान्यांचे विस्तारीकरण झाल्याने गाळपासाठी जास्तीजास्त ऊस मिळावा यासाठी कारखान्यांचा हा खटाटोप आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानीची ऊस परिषद झाल्याशिवाय त्यांना गाळप सुरु करता येणार नाही. तरीही काहींनी दांडगाव्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चांगली समज दिली जाईल असा इशारा शेट्टी यांनी दिला. यंदा साखरेच्या दराचे तुणतुणे कारखानदारांनी वाजवू नये कारण हंगामात 3800 रुपये पर्यंत टेंडर गेले आहेत. शासनाच्या दरापेक्षा जादा पैसे मिळाले आहेत. कारखानदारांकडे पैसे शिल्लक आहेत. त्यामुळे एकरकमी एफआरपी देण्यात त्यांना कोणतीही अडचण नाही. शिल्लक साखरेचे कारण पुढे केले जाऊ शकते. मात्र हा ही एक बनाव आहे. साखर शिल्लक राहिली असली तरी त्यांच्यावर व्याजाचा बोजा कारखान्यावर पडणार नाही. असे शेट्टी यांनी सांगितले.
केवळ काहीतरी कारण सांगून एफआरपीचे तुकडे पाडायचे शेतकऱयांचे पैसे द्यायचे नाहीत. असे धोरण आहे. नीती आगोला हातशी धरुन एफआरपीच्या तुकडÎाची खेळी खेळली जात आहे. तीन टप्प्यातील एफआरपीचे धोरण पेंद्राचे नाही असे म्हणणाऱया माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनाही त्यांनी नाव न घेता फटकारले ते म्हणाले, त्यांनी याचा अभ्यास करावा, कागदपत्रे समजून घ्यावीत, यासाठी अभ्यास वर्ग लावलात अगदीच बरे होईल असा टोला हाणाला.