प्रतिनिधी / कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विसाव्या ऊस परिषदेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांचे प्रमुख कार्यकर्त्यांसह दुपारी चार वाजता आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले मध्यवर्ती चौकातून येण्याच्या मार्गावर व्यासपीठापर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
शेट्टी यांच्यासमवेत रविकांत तुपकर सावकर मादनाईक अजित पोवार जलंदर पाटील व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि सीमा भागातून हजारो शेतकरी मैदानावर एकवटलेले आहेत लखिंपुर खेरी उत्तर प्रदेश येथे शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडून मारले त्याच बरोबर आत्महत्या केलेले शेतकरी यांना श्रद्धांजली वाहण्यात अली त्या नंतर परिषदेला सुरवात झाली.