नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश (80) यांचे शुक्रवारी निधन झाले. लीव्हर सोरायसीस या आजाराने त्रस्त असलेल्या अग्निवेश यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांची प्रकृतीही खालावली होती.
गेल्या काही दिवसांपासून अग्निवेश यांची प्रकृती खालावली होती. त्यांना नवी दिल्लीतील लिव्हर अँड बायिलरी सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना लीव्हर सोरायसीस हा आजार जडला होता. आजार अधिक बळावल्यामुळे गेल्या काही दिवसात त्यांच्या मुख्य अवयवयांनी काम करणे बंद केले होते. मंगळवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वरि÷ डॉक्टरांचे एक पथक त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
स्वामी अग्निवेश हे बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यामुळे अधिक चर्चेत आले होते. ते सामाजिक मुद्यांवर नेहमी भाष्य करत असत. 1970 मध्ये स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता. 1977 मध्ये हरियाणाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. 1981 मध्ये त्यांनी बंधुता मुक्ती मोर्चा नावाच्या संघटनेची स्थापनाही केली होती. 2011 मध्ये त्यांनी लोकपालसाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही स्वामी अग्निवेश सहभागी झाले होते. मात्र काही मतभेद झाल्याने ते या आंदोलनातून दूर झाले होते.