प्रतिनिधी/अक्कलकोट
असंख्य भाविकांचे आराध्य दैवत असलेले श्री. स्वामी समर्थ महाराजांचे आपणही निस्सिम भक्त आहोत. समर्थांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आपल्याला सेवेची संधी लाभल्याने माझ्या जीवनातील हा एक गौरवास्पद क्षण असल्याचे सांगून या जिल्ह्यातील नागरिकांच्या अडीअडचणी निवारण करण्याचे काम आपण स्वामी सेवा समजूनच करू असे प्रतिपादन जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री दिलीप वळसे–पाटील यांनी व्यक्त केले. श्री. वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येवून स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी वळसे–पाटील यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून सत्कार केला. यावेळी मंदिराचे पुरोहित मोहन महाराज पुजारी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष बळीराम साठे, शहर अध्यक्ष भारत जाधव, प्रांतअधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अंजली मरोड, मुख्याधिकारी आशा राऊत, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, अशपाक बळोरगी, दिलीपभाऊ सिध्दे, उमेश पाटील, शिवानंद पाटील आदी. उपस्थित होते.