अध्याय चौदावा
उद्धवाने भगवंतांना विचारले की, ब्रह्मवादी महात्म्यांनी आत्मकल्याणासाठी भक्ती, ध्यान, इत्यादी अनेक साधने सांगितली आहेत. तुम्ही तर स्वतः मुक्तीला कारण भक्तीच होय असे सांगता. तुम्ही म्हणालात की, या भक्तीने सर्व तऱहेची आसक्ती नाहीशी होऊन मन तुमच्या ठायीच लागून राहाते. भक्तीच्या योगाने तत्काळ आत्मस्वरूपाची प्राप्ती होते म्हणून भक्त इतर साधनांची आशाच करीत नाहीत. सर्व संगांचा त्याग करतात. अशी भक्तीच मोक्षमार्गामध्ये मुख्य आहे. फलाची आशा सोडून तुमचे भजन करणे , हेच मोक्षाचे मुख्य साधन होय. तेव्हा इतर मंडळी जी साधने सांगतात, त्यांनी आत्मस्वरूपाची प्राप्ती होते किंवा नाही, हे तुम्ही मला उलगडून सांगा.
उद्धवाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंत म्हणाले, वेदशास्त्र शिकलेले यातील जाणकार, ज्ञानी समजले जातात. पण ज्ञानी मंडळींचा स्वभाव त्रिगुणात्मक असल्यामुळे ते आपआपल्या आवडीप्रमाणे साधने सांगत असतात. ज्या गुणाचा त्याच्यावर प्रभाव असतो, तो तेच साधन खरे मानतो. त्यांना ज्ञानाचा अभिमान वाटत असल्याने ते अनेक साधनांबद्दल बडबडत असतात. उद्धवा! हीच परंपरा पुष्कळ दिवस चालत असल्यामुळे शास्त्रीपंडितांच्या ज्ञानातील गाभा नाहीसा होऊन ते मलिन झाले आहे. त्यामुळे त्याला क्षुद्र फळे येत असली तरी तेच ज्ञान खरे असे ते मानतात.
मुळात मी सांगितलेली वेदवाणी स्पष्ट आहे. पण सतयुगातील प्रलयकालामध्ये ती नाश पावली. चालू कल्पाच्या आरंभाला तीच वेदवाणी मी ब्रह्मदेवाजवळ प्रगट केली, त्याच्याकडून ती अनेकांना मिळाली. यांपैकी काही सात्त्वकि, काही राजस आणि काही तामस स्वभावाचे होते. त्यांच्या स्वभावानुसार वेगवेगळय़ा बुद्धीप्रमाणे आणि स्वभावांप्रमाणे वेदांचे अर्थ वेगवेगळे लावले गेले.
गुणाच्या प्रकारानुसार, स्वभाव असतो आणि वासनाही त्याप्रमाणेच होत असतात. प्राणिमात्रामध्ये कमीजास्तीपणा व भेद वासनेमुळेच निर्माण झाला आहे. थोडक्मयात लोकांकडून पैसा अडका, धनधान्य, मान मरातब अशा गोष्टींची अपेक्षा ज्या ज्ञानी पंडितांना त्यांच्यावर असलेल्या रज व तम गुणांच्या प्रभावामुळे असते, ते वेदाचा तसाच अर्थ ग्रहण करतात आणि शिष्यांना तोच उपदेश सांगत असतात.
आपला स्वार्थ साधण्यासाठी वेदाचा काही विचित्र अर्थ करणे व तोच खरा आहे असे सांगणे, भलतीच संगति लावणे, भलतीच साधने जवळ बाळगणे आणि विचित्र उपदेश करणे, हे सर्व त्रिगुणातील मतभेदांमुळे घडते. याप्रमाणे आपलीच प्रकृति अनेक प्रकारच्या मतात विभागली असून त्यातील मतभेदांची दरी वाढलेली आहे. स्वप्न हे खोटे असते, तरी ते निजलेल्या मनुष्याला सर्वस्वी खरेच असल्याप्रमाणे भासते, त्याप्रमाणे भिन्न भिन्न मतांच्या गोष्टी ते सर्वस्वी खऱयाच आहेत असे मानतात.
ही वेदवेत्यांची गोष्ट झाली. जे वेदशास्त्र शिकलेले नाहीत त्यांना उपदेशपरंपरेने चालत आलेले खरे वाटते. काहींची विचारसरणी वेदाच्या विरुद्ध असते. ते आपल्या मताप्रमाणे पाखांडमतच स्थापन करतात आणि तेच शिष्याच्या मनात भरवून देतात. उद्धवा! निरनिराळय़ा प्रकारच्या वासना गुणांच्या अनुरोधाने बनलेल्या असतात. त्यामुळे माणसांच्या प्रकृतीही भिन्न भिन्न होतात.
या सर्वांचे मूळ कारण माझी मायाच आहे असे निश्चित समज. माझ्याच मायेने श्रे÷ लोकांनाही मोहित केले आहे, सर्व लोक विवेकनष्ट केले आहेत आणि त्यांना मोक्षमार्गाचा विसर पाडून विषयलंपटपणाचाच विचार करावयास लावले आहे. यामुळे लोकांची नि÷ा भ्रष्ट झाल्याने त्याना मोक्षद्वाराचे विस्मरण होते त्यामुळे ते भलत्याच साधनांच्या खटपटीची, अनेक प्रकारच्या साधनांची युक्ति, आपापल्या मतानुसार सांगतात. आपापला स्वार्थ साधण्यासाठी, त्यांच्या सोयीने मोक्ष मिळवण्यासाठी रज, तम गुणांनी प्रभावित झालेले शास्त्रीपंडित निरनिराळय़ा प्रकारच्या साधनांची भलावण करतात. त्यामुळे मोक्ष मिळवण्यासाठी अनेक साधने आहेत असा गैरसमज लोकांच्यात पसरला
आहे.
क्रमशः