प्रतिनिधी / सांगली
डॉ. पतंगराव कदम यांनी आमदार असताना आणि महाराष्ट्राचे मंत्री म्हणून प्रचंड मोठा कामाचा डोंगर रचला आहे. दिलदार आणि मोठ्या मनाचा लोकनेता, संवेदनशील माणूस म्हणून ते लोकप्रिय होते. शिक्षण, सहकार, कृषी, साखर उद्योग, औद्योगिक विकास या सर्वच बाबतीत त्यांनी संस्था उभ्या केल्या आणि यशस्वीपणे चालविल्या, यामाध्यमातून हजारो लोकांचे कल्याण झाले आहे.
त्यांचे कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे उद्गार तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी कसबे डिग्रज येथील संस्थेच्या डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी काॅलेज येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.
यावेळी प्राचार्य डी. डी. चौगुले, संचालक पप्पू शिरोटे, प्रा. घाडगे, महावीर स्टेट अकॅडमी इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राचार्या मोटे उपस्थित होते.