प्रतिनिधी /पणजी
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पक्षाच्या हितासाठी काही तत्वांकडे समजोता करणे टाळले नाही. असे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले. बाबूश मोन्सेरात यांना पणजीची उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील लोकांकडूनच ज्या पध्दतीने विरोध केला जात आहे त्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त कले आहे. मनोहर पर्रीकरांनीच बाबूश मोन्सेरात यांना 2002 सालात मंत्रीपद दिले होते नंतर 2017 सालात त्यांना पीडीएचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. असेही तानावडे यांनी सांगितले.
काल पणजीतील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदानंद तानावडे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत रार्ष्टीय प्रवक्ते केशव उपाध्ये, म्हाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार व सरचिटणीस नरेंद्र सावईकर उपस्थित होते. उत्पल पर्रीकर यांनी थांबणे गरजेचे आहे. आपण विद्यमान आमदार असतानाही 2012 साली आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली होती. तरीसुध्द आपण पक्षात राहिलो पक्ष सोडला नाही. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी नेहमीच स्वहितापेक्षा देशहित, पक्षहिताला प्रधान्य दिले आहे. त्यामुळे पक्ष नेत्यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षापासून दुर नजाता पक्षासाठी कार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.
लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पक्षाने दोन वेळा अध्यक्ष केले तसेच मुख्यमंत्रीपदही दिले. ते पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी पक्ष सोडावा ही दुर्दैवार्ची बाब आहे. आपल्याला उमेदवारी नाकारली तेव्हा आपण पक्ष सोडला नव्हता. केवळ निवडणूक लढविणे म्हणजे सर्वेसर्वा नव्हे. पक्षाचे निष्ठापूर्वक काम करीत राहिल्यास पक्ष त्याची दखल घेऊन नक्कीच सन्मान करेल असे सदानंद तानावडे यांनी सांगितले.
आज निवडणूका तोंडावर आल्या असून विविध पक्षातून आरोप प्रत्यारोह होत आहेत. भाजपने या निवडणूकीत पहिल्यांदास चाळीसही जागा लढविण्याचे ठरविले आहे. पहिल्या यादीत 34 उमेदवार जाहिर केले आहे. सहा उमेदवार आज रात्री उशीरा किंवा उद्यापर्यंत जाहिर करण्यात येणार आहेत. इतर पक्ष स्वतः जिंकण्यासाठी लढत नसून केवळ भाजपाला सत्तेपासून रोखणे हा एकमेव उद्देश त्यांच्या नजरे समोर आहे. ज्यांना सत्तेत येण्याचा विश्वासच नाही ते केवळ दुसऱयांचे पाय ओढण्याचे काम करतील असेही सदानंद तानावडे यांनी सांगितले. पक्षाने निवड केलेल्या उमेदवारांवर पक्षाचाच विश्वास नसेल तर मतदारांनी त्या उमेदवारांवर विश्वास कसा ठेवणार असा प्रश्न सदानंद तानावडे यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्षाने ज्यांना पक्षाची उमेदवारी दिली त्यांना निवडून आल्यानंतर पक्ष साडून जाणार नाही म्हणून मंदीर, चर्चमध्ये शपत घ्यायला लावली. ही एक दुर्दैवाची बाब आहे. काँग्रेस पक्षाला आमदार मिळाले तरी सरकार स्थापन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचे आमदार फुणार अशी त्यांना मिती आहे. नेतृत्व योग्य नसेल तर अशी परिस्थिती होते. याउलट आज भाजपा केंद्रांत तसेच राज्यात सत्तेवर आहे. स्थिर सरकार आणि विकास म्हणजे काय याचा प्रत्येय भाजपने दाखविला आहे. अंतोदय तत्वावर सरकार चालविणाऱया पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. नेतृत्व कसे असावे त्याचे जिवंत उदाहरण मोदी असल्याचेही तानावडे यांनी सांगितले.