प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. बेळगाव तालुक्मयातील हंदिगनूर गावातील मराठी प्राथमिक शाळेत आंबा, काजू, बदाम, चिंच, फणस व पेरू अशा फळांच्या रोपटय़ांची लागवड करण्यात आली.
प्रारंभी फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर यांनी वृक्षारोपणाचा उद्देश सांगितला. शाळेच्या मुख्याध्यापिका एन. के. शेख यांनी भविष्यात या झाडांचे संगोपन करू, असे सांगितले.
अध्यक्षा नीता पाटील यांनी अनेक कोविड रुग्णांना ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावावे, असे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी जायंट्स नर्सरीचे मदन बामणे व सुनील मुतकेकर यांनी रोपटी उपलब्ध करून दिली.
यावेळी सखीच्या अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा चंद्रा चोपडे, खजिनदार लता कंग्राळकर, माजी अध्यक्षा नम्रता महागावकर, मुख्याध्यापिका एन. के. शेख, शिक्षिका रूपा किल्लेकर, शीतल दावणे, सारिका कुंभार, प्रमिला कोळेकर, तसेच सखीच्या सदस्या सुलक्षणा शिनोळकर, मनीषा कारेकर, दीपा पाटील, भाग्यश्री पवार, वरदा अंगडी, हेमा सांबरेकर, सविता मोरे उपस्थित होत्या.