स्वातंत्र्यपूर्व काळात कसबे येळ्ळूर हे कुरूंदवाड संस्थानात होते. गावचा पूर्वापार मुख्य व्यवसाय शेती होता. हणमंतगौंड वंशज पाटील समाज मोठय़ा प्रमाणात होता. त्यामध्ये तीन तरफ आहेत. आपल्या पाटील समाजाचा विकास व्हावा, हा उदात्त दृष्टीकोन ठेवून 12-9-1944 रोजी मल्हारराव जोतिराव पाटील (पोलीस पाटील) यांच्या घरी मिटींग घेऊन सर्वे नं. 1007 तीन एकर वीस गुंठे व सर्वे नं. 897 तीन एकर पंधरा गुंठे या जमिनीच्या उत्पन्नातून पाटील समाजाच्या मुलांच्या हितासाठी एक शैक्षणिक ट्रस्ट स्थापण्यात आली ती म्हणजे श्री हणमंतगौंड ध्रुवनिधी ट्रस्ट. या संस्थेचे संस्थापक कै. मल्हारराव पाटील (पोलीस पाटील) या संस्थेचे पहिले अध्यक्ष कै. अमृतराव नारायण पाटील (वकील), कै. बापूराव गोविंदराव पाटील, कै. गंगाराम यशाजी पाटील कै. भरमाणी आ. पाटील, कै. गावडू रामचंद्र पाटील, कै. बाळाप्पा आ. पाटील, कै. रामचंद्र बळवंत पाटील, कै. इराप्पा गोविंद पाटील, कै. रावजी दे. पाटील हे सर्वजण सभासद होते.
याच कार्यकारी मंडळाने स्वखर्चाने श्री चांगळेश्वरी मंदीरसमोरील कै. मल्लाप्पा सिदलिंगाप्पा पोतदार यांची जागा 600 रूपयांना घेऊन संस्थेचा पाया रचला. यामध्ये कै. मल्हारराव पाटील (पोलिस पाटील) यांचा सिंहाचा वाटा आहे. पाच वर्षानंतर नवीन कार्यकारी मंडळ नेमण्यात आले. गावच्या युवकांना व्यायामाची आवड निर्माण करणे, शरीर बलदंड व्हावे, कुस्त्या करून बेळगाव परिसरात येळ्ळूरचा नावलौकिक व्हावा, हा उदात्त दृष्टीकोन ठेवून श्री हणमंतगौंड व्यायाम शाळा बांधण्यात आली. नवीन कार्यकारी मंडळ समाजाच्या विकासासाठी नवीन विचार अशा विचारातून 9-12-1962 रोजी
श्री. मल्हारराव पाटील (पोलीस पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली पाच खोल्या बांधण्यात आल्या व त्या भाडे स्वरूपात देण्यात आल्या. जस जसे ध्रुवनिधीचे उत्पन्न वाढत गेले तसा श्री हणमंतगौंड ध्रुवनिधीला आकार देण्यात आला. म्हणून तर आज येळ्ळूर गावच्या केंद्रबिंदू असलेल्या चांगळेश्वरीदेवी मंदीरसमोर श्री हणमंतगौंड ध्रुवनिधीची भव्य इमारत मोठय़ा दिमाखात उभी आहे.
या कार्यासाठी प्रामुख्याने नाव घ्यायचे झाल्यास रामचंद्र नागोजी पाटील यांचं घ्यावं लागेल. ते त्या वेळचे धडाडीचे कार्यकर्ते होते. सन 1952 ला या संस्थेचे सेपेटरी, सन 1973 ला अध्यक्ष आणि आजतागायत सन 2019 पर्यंत सेपेटरी. असा कार्यभार सांभाळत गावच्या पाटील समाजाबरोबर इतर समाजाची शेतीच्या सर्व्हे नंबरची इथ्यंभूत माहिती त्यांना आहे. पाटील समाजाच्या जागेचं रक्षण करण्यासाठी समाजाच्या जागेच्या न्यायालयीन कामकाजासाठी हणमंत बळवंत पाटील (वकील) यांचेही योगदान फार मोलाचे आहे.
युवा पिढीला या संस्थेची माहिती असावी, संस्थेच्या संपत्तीचे रक्षण व्हावे, भरभराट व्हावी, युवा पिढीला प्रोत्साहन देण्यात यावे, हा दृष्टीकोन ठेवून 1989 मध्ये किरण (आण्णा) हणमंत पाटील यांना समाजातील जाणकार लोकांनी अध्यक्षपद दिले. सन 1989 पासून महादेव बाळाप्पा पाटील, गोविंद बापू पाटील, कै. बाळाप्पा रवळू पाटील, अशोक कृष्णा पाटील, शशिकांत शंकर पाटील, शटवाजी गणेश पाटील त्याचबरोबर सेपेटरी रामचंद्र नागाप्पा पाटील या कार्यकारी मंडळाने या संस्थेमध्ये फार मोठी विकासाची भर घातली आहे. संस्थेच्या खालच्या इमारतीचे मोजकेच भाडे होते. उत्पन्न कमी असूनसुद्धा कोणताही वायफळ खर्च न करता वरच्या मजल्याचे बांधकाम करून उत्पन्नात वाढ केली. व्यायाम शाळेच्या पैलवानांना आंघोळीसाठी पाण्याची विहीर, थडेदेव (हणमंतगौंड) मंदीर रस्ता, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला, येळ्ळूर गावच्या पाण्यासाठी संस्थेची सर्व्हे नं. 1007 मधील दोन गुंठे जागा दान, कंपाऊंड बांधणे, रंगकाम करणे इत्यादी महत्वाची कामे करून संस्थेला नावारूपास आणून आज संस्थेकडे 18 लाखाची ठेव ठेवून पाटील समाजाच्या युवकांसमोर आदर्श ठेवला.
बदलत्या काळानुसार पाटील समाजातील इतर युवकांना, नागरिकांना संस्थेचे कार्य करण्याची संधी मिळावी, हा उद्देश ठेवून 15 डिसेंबर 2019 रोजी नविन कार्यकारिणी तयार करण्याचा ठराव विठ्ठल द. पाटील, मऱयाप्पा आ. पाटील, अनंत बा. पाटील, शिवाजी गुं. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्यासाठी तीन तरफातून 21 कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. श्री चांगळेश्वरी मंदिराच्या उजव्या बाजूला श्री कोलकम्मा मंदिराची जागा आहे. त्या जागेचासुद्धा विकास व्हावा यासाठी श्री कोलकम्मा मंदिर ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टचेसुद्धा 21 लोकांमध्ये कार्यकारी मंडळ नेमण्यात आले आहे. श्री हणमंतगौंड ध्रुवनिधीचे नूतन अध्यक्ष सी. बी. पाटील, उपाध्यक्ष किरण य. पाटील, सेपेटरी, अविनाश आ. पाटील, सदस्य, अनिल पुं. पाटील, अशोक रा. पाटील, जोतिबा मा. पाटील, प्रकाश चां. पाटील, कोलकम्मा देवी मंदिर ट्रस्टसाठी अध्यक्ष. मनोहर सी. पाटील, उपाध्यक्ष, यल्लुप्पा आ. पाटील, सेपेटरी, भाऊराव म. पाटील, सदस्य हेमंत पां. पाटील, गावडू र. पाटील, मधु रा. पाटील, डी. जी. पाटील, सल्लागार, दशरथ ना. पाटील, रोहन प. पाटील, हणमंत जे. पाटील, मनोहर ना. पाटील, अनिल अ. पाटील, रविकांत ना. पाटील, सुभाष व्य. पाटील. सन 1944 पासून आजतागायत सर्व वडीलधारी कार्यकारी मंडळाने आपापल्या परीने संस्थेच्या विकासासाठी आपले योगदान दिले आहे. आपल्या पाटील समाजाबरोबर इतर समाजालासुद्धा सामावून घेऊन संस्थेचे नांव येळ्ळूरमध्ये अबाधित राखले आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. नविन कार्यकारिणी मंडळानेसुद्धा संस्थेच्या प्रगतीसाठी काम करून संस्थेच्या उत्पन्नात वाढ, विकासात भर घालतील, याच शुभेच्छा!
श्री. डी. जी. पाटील,
श्री हणमंतगौंड वंशज, येळ्ळूर