कुरिअरच्या वाहनांतून कोल्हापूरहून चांदीची वाहतूक, तिघा जणांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
कोल्हापूरहून बेळगावकडे बेकायदा चांदी वाहतूक करणारे वाहन अडवून 50 किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सोमवारी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी टोल नाक्मयाजवळ ही कारवाई करण्यात आली असून कोल्हापूर व बेळगाव येथील तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.
सुहास भास्कर गायकवाड (वय 45, रा. केर्ले, ता. करवीर, जि. कोल्हापूर), मारुती अमृत मुतगेकर (वय 38, रा. गोकुळनगर, हिंडलगा), संदीप सुहास गायकवाड (वय 31, रा. केर्ले, ता. करवीर, जि. कोल्हापूर), अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा कलम 98 अन्वये यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हुक्केरीचे मंडल पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, विठ्ठल नायक, एल. वाय. किलारगी, एच. बी. पाटील, एस. एन. अरबळ्ळी, एम. व्ही. नावी आदींनी ही कारवाई केली आहे. एमएच 50 ए 2634 क्रमांकाच्या प्रुझरमधून चांदीची वाहतूक करण्यात येत होती.
कोल्हापूर जिह्यातील हुपरीहून बेकायदा चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच हत्तरगी टोल नाक्मयाजवळ प्रुझर अडवून पोलिसांनी तपासणी केली. या वाहनात 47 किलो 989 ग्रॅम चांदीचे दागिने सापडले. त्याची किंमत 14 लाख 39 हजार 670 रुपय इतकी आहे.
पोलिसांनी वाहनासह 18 लाख 39 हजार 670 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रुझर वाहनाची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी चांदीच्या दागिन्या संबंधी अधिकृत पावत्या विचारल्या असता वाहनांतील तिघा जणांकडे कसल्याच पावत्या नव्हत्या. त्यामुळे हे दागिने जप्त करुन तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी चांदी जप्त करणाऱया पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.