प्रतिनिधी / जोयडा
घोडेगाळी गावच्या शिवारात दास्तान करून ठेवलेल्या भाताचे हत्तीने नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱयाचे सुमारे 10 हजार रुपयाहून अधिक नुकसान झाले आहे. जोयडा आर. एफ. ओ. यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
नगरी गावचे शेतकरी शांताराम चंद्रू नाईक यांची भात शेती घोडेगाळी गावाकडे आहे. यावेळी भात कापणी करून भात दास्तान करून ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवार दि. 7 रोजी सुमारे 11.30 च्या दरम्यान हत्तीच्या कळपाने या भाताच्या होळीवर ताव मारल्याने शेतकऱयास अर्थिक नुकसान झाले आहे.
शांताराम नाईक यांनी याची लिखीत तक्रार जोयडा वन क्षेत्र अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केले. अरण्य विभागाच्या अधिकारी यांनी स्थळास भेट देऊन पंचनामा केला आहे.