कळंबा ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन
कळंबा / प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या स्थापनेपासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत केंद्राच्या योजना लागू होण्यासाठी तसेच कोल्हापूरचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश होण्यासाठी शहराची लोकसंख्या किमान साडेसात ते दहा लाख असणे गरजेचे आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ महत्त्वाची आहे. आज ना उद्या हद्दवाढ अटळ आहे त्यामुळे शहरात येण्याची आत्तापासूनच तयारी ठेवा आणि हा हद्दवाढीबाबत सकारात्मक विचार करा असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. तसेच पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांनीही हद्दवाढ स्वीकारण्याचे आवाहन केले.
कळंबा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी ग्रामविकास विभागाकडून 50 लाख रूपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसनमुश्रीफ यांनी दिले. कळंबे तर्फ ठाणे येथील ग्रामपंचायतीच्या नवीन प्रस्तावित इमारतीचे भूमीपूजन श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील तर व्यासपीठावर खा. संजय मंडलिक, आ. ऋतूराज पाटील, सरपंच सागर भोगम,गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, सदस्य शशिकांत चुयेकर, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, करवीर पं.स. सभापती मंगल पाटील, आदी उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, गटविकास अधिकाऱ्यांनी मनरेगामधून पाणंद रस्तेनिर्मितीचे नियोजन करावे. राज्यातील 4 लाख 20 हजार असंघटीत कर्मचाऱ्यांना आपल्या विभागामार्फत संरक्षण देण्याचा आपला मानस आहे. हदवाढ भागात समाविष्ट होण्यासाठी कळंबा गावातील ग्रामस्थांनी सकारात्मकतेने विचार करावा, असे आवाहन करून उपस्थित नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
तर पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले,ग्रामपंचायींचा कारभार सुरळीत सुरू राहण्यासाठी ग्रामपंचायतींच्या स्वमालकीच्या प्रशस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी परिपूर्ण इमारती असणे आवश्यकआहे. कोणत्याही गावातील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्यकेंद्र, आणि शाळा यांच्या माध्यमातूनच गावाची दिशा ठरत असते. कळंबा सारख्या मोठ्या गावाच्या ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ईमारत असणारे आवश्यक होते, लवकरच स्वतंत्र आणि देखणी ईमारत गावकऱ्यांच्या सेवेसाठी लवकरच उभी राहणार आहे.
कळंबा गावच्या विकासासाठी आर्थिक निधी कमी पडू देणार नाही. ग्रामपंचायतीच्या नूतन इमारत उभारणीकरिता 25/15 योजनेंतर्गत 50 लाखांचा निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून विद्यमान खासदारांनी या प्रस्तावित इमारतीसाठी 25 लाखांचा निधी दयावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. थेट पाईपलाईन द्वारे कळंबा पाचगाव मोरेवाडी या तीन गावांना पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आल याप्रसंगी खा.संजय मंडलिक,आ .ऋतूराज पाटील यांनीही आपले
यावेळी, पं.स. सभापती मंगल पाटील, गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील, शारंगधर देशमुख, शंकरराव हळदे, सौ. मिनाक्षी पाटील, मधुकर रामाणे, गोकुळ संचालक बाबासो चौघुले, शशिकांत चुयेकर, बायजी शेळके, प्रकाश पाटील, जि.प.स वंदना पाटील व इतर प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.