मुंबई / ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला होता, असं काल म्हटलं होतं. मोदी यांनी केलेल्या या विधानावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हद्द झाली राव, मोदीजी आणखी किती फेकणार..असे म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
नाना पटोले यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ”और कितना फेकोंगे मोदी जी. हमारे मराठी मे एक लाईन है…. हद झाली राव. किसान आंदोलन कर कर एक शब्द तक आपके मुह से निकला नही…. और आझादी की बात करने बांग्लादेश जाते हो…… किसानो को आंदोलनजीवी आपने कहा था…. आप कोण हुए अब ढोंगीजीवी.”
बांगलादेशाच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात भाग घेण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशात गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं. त्यावेळी मी 20-22 वर्षाचा असेल. वेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो, असे मोदी म्हणाले होते. या विधानावरून सोशल मीडियवर मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.