बेळगाव : शहरात विविध ठिकाणी पाण्याची गळती सुरू असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया चालले आहे. हनुमान नगर येथील बुडा स्कीम क्र. 40 मध्ये मागील 4 दिवसांपासून पाण्याची गळती सुरू आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने रहिवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पाण्याचे योग्य नियोजन करण्यात न आल्याने वारंवार पाण्याची गळती सुरू आहे. बऱयाचशा भागात गळती सुरू असूनही त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. रहिवाशांनी तक्रार करून पाणी पुरवठा मंडळाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याने रहिवासी संतापले आहेत. मागील चार दिवसांपासून दररोज हजारो लिटर पाणी हनुमान नगर येथे वाया चालले आहे. पाण्याची गळती होऊन पाणी गटरीमध्ये वाया चालेले आहे. यामुळे याकडे कोणी लक्ष देईल, का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.